आठवणीतील पाऊस - देवाक काळजी! - १
आठवणीतील पाऊस - देवाक काळजी! -१
दिनांक - ७ जुन २०१६
पावसाची रिमझिम नुकतीच सुरू झाली. ऑर्डर दिल्या प्रमाणे आरोंदा बाजारातील जगप्रसिद्ध शेखर चा, हॉटेल मधील गरमा गरमा कांदा भजी व कडक चाय टेबल वर आली. ओलेचिंब असल्यामुळे तो गरम भजीचा वास व चायची वाफ यामुळे थोडी ऊब जाणवत होती. भजीचा आस्वाद घेताना मी दुसऱ्याच विचारात होते. आता दोन घटकांपूर्वी घडलेला तो प्रसंग, स्वप्नं होते की सत्य? अचानक चायच्या पेल्याचा जिभेला चटका बसल्यावर मी खरे भानावर आले.
पूर्वार्ध,
जून महिना म्हणजेच पावसाचे दिवस सुरू होते. मी गावा कडून पुण्याला येणार होते, म्हणून बाजारातून काहीतरी घेऊन यावे यानिमित्ताने मी व माझी भाची ऋतू आरोंदा बाजारात घरातील ज्युपिटर गाडी घेऊन निघालो. "पावसाचे दिवस आहेत सांभाळून गाडी चालवा गं, सुखरूप घरी या. देवाक काळजी!" अशा नेहमीच्या पाठ झालेल्या सूचना घरातील मोठ्यांकडून मिळाल्या. खरे तर! बाजारात जाणे हे फक्त निमित्त होते. आम्ही, केरी च्या समुद्र किनाऱ्यावर जाणार होतो. परंतु घरी जर खरे कळाले असते तर घरातून बाहेर जाण्याची परवानगी कधीच मिळाली नसती. आपल्या मुलांच्या अती काळजीपोटी कधी कधी पालकांकडून मुलांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण हरवतात व त्यामुळे मुले नकळत भ्याड बनून आत्मविश्वास हरवून बसतात. फक्त आरोंदा बाजारात जाण्याच्या अटीवर आम्ही गाडी घेऊन घरातून बाहेर पडलो. समुद्र भेटीच्या आतुरतेने व आज काहीतरी पहिल्यांदाच करत असलेल्या धाडसामुळे मन एकदम आनंदित होऊन गेले. तसे बघितले तर आरोंदा हे निसर्ग संपन्न सुंदर गाव गोवा राज्याच्या सिमेवर येते. बाजारातून दहा मिनिटाच्या अंतरावर गोवा हे राज्य. एका सीमाने जरी विभागले गेले असतील तरी हे दोन्ही प्रदेश आमच्या साठी एकच. त्या दिवशी महाराष्ट्रात म्हणजेच आरोंदा मध्ये पावसाचे तसे काहीच चिन्ह नव्हते. आकाश मोकळे होते. वाऱ्याच्या वेगाने सुसाट गाडी चालवत गाणी गात गोवा सीमा पार करून केरी च्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही पोहचलो. समुद्राच्या लाटांचा बेधुंद आवाज दूरूनच कानावर पडत होता. नेहमीप्रमाणेच किनाऱ्यावर वर्दळ नव्हतीच. गाडी स्टँड वर् लावताना एक परदेशी कुटुंब समुद्राचा मनसोक्त आनंद लुटून परतत होते. किनाऱ्यावर फक्त ते कुटुंब व आम्ही दोघी एवढेच होतो. आमच्या घरगुती कपड्यांवरून आम्ही कदाचित त्यांना गाववाले वाटले असू म्हणून त्यांनी आमच्या कडे बघून स्मित हास्य केले. जणू ते त्यांच्या हास्यातून सांगत होते की तुम्ही किती नशिबवान आहात, की तुम्हाला हा सुंदर , निर्जन समुद्रकिनारा लाभलेला आहे. गाडी पार्क करून आम्ही किनाऱ्यावरील आईचे आजोळ चे असलेले कुलदैवत श्री आजोबा च्या मंदिरात गेलो. पाया पडून थेट समुद्र किनारा पळतच गाठला.
किनाऱ्यावरील स्वच्छ चंदेरी मऊशार रेतीवर आमचे पाय उमटु लागले. अफाट लांब किनाऱ्यावर आम्ही दोघी सोडून एकही मनुष्य तिथे दिसत नव्हता. किनाऱ्याला आतुरतेने भेटण्यासाठी येणाऱ्या पारदर्शक बेधुंद लाटांचा खेळ आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. समोर दिसणारा तो अफाट समुद्र व आकाश जणू एकच आहे असे भासत होते. दूरवर तेरेखोल किल्ला डौलाने उभा होता. त्यावर आलेल्या काळ्या ढ्गांची छत्री मात्र सुरेख दिसत होती. आम्ही एका वेगळ्याच जगात होतो. काहीही न बोलता फक्त डोळ्यांनी त्या प्रत्यक्ष निसर्ग चित्राचा आस्वाद घेत होतो. समुद्राच्या पाण्यासोबत खेळताना वेळ कसा निघून जात होता याचे भानच राहिले नव्हते. खेळताना अचानक लक्ष तेरेखोल किल्ल्याकडे गेले आणि आश्चर्य! किल्ला आता तिथे दिसत नव्हता. मी घाबरून ऋतुला विचारले "ऋतू, अगं किल्ला कुठे गेला?" खेळत - खेळत आम्ही किनाऱ्यावरून दुसरीकडे आलो का? अशी मनात भीती वाटली, म्हणून मी पटकन मागे बघितले तर आजोबांचे मंदिर तर् तिथेच होते. परंतु किल्ल्या कडील दिशे कडे काळोख दिसत होता व आम्ही उभे होतो तिथे मात्र शुभ्र प्रकाश. पुढील क्षणातच तो काळोख पुढे सरकू लागला. व समुद्रावर जोरात पावसाचे मोती आदळू लागले. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही दोघी हातात हात घेऊन समुद्रातून मंदिराकडे धावत निघालो. हळूच मागे वळून बघितल्यावर फक्त काळे ढ्ग व पांढरा शुभ्र लाटांच्या भिंती जणू आमचाच पाठलाग करत आहेत असे वाटले. जीव मुठीत घेऊन आम्ही मंदिरात पोहचलो. व पायरीवर बसलो.पायऱ्यांवरून बघताना मगाशी दिसणारा शांत समुद्र आता दिसत नव्हता. आवेशाने पावसाच्या सरी कोसळत होत्या, बेधुंद वाटणाऱ्या लाटांचा आवाज आता भीतीदायक वाटत होता. सोसाट्याच्या वाऱ्याने समुद्रकिनऱ्यावरील झाडे एकमेकांना आदळत होती.निसर्गातील संगीताचा अभुतपुर्व सोहळा ऐकायला भेटत होता. पाऊस व वारा या दोघांमध्ये जणू स्पर्धा सुरू होती. व दोघेही माघार घेत नव्हते. समुद्राच्या रुद्र रूपाचे प्रथमच दर्शन घडत होते. व आता संपले सगळे, आयुष्यातील हा शेवटचा दिवस असे एक क्षणभर उगाच वाटून गेले. वेळ निघून जात होती तरी ते वादळ काही थांबत नव्हते.
घरी तर कोणालाही माहिती नव्हते आम्ही कुठे आहोत आणि आज इथे काही झाले तर घरी काय होईल? या विचाराने पोटात गोळा आला. समुद्र जरी खूप प्रिय असला तरी आज स्वतःला त्याच्यात सामावून घ्यायचे नव्हते. लगेच मी ऋतुला बोलले "चल घरी जावू". तिने आश्चर्याने माझ्या कडे बघितले , व बोलली "आत्या, या पावसात? आपल्याकडे रेनकोट, छत्री काहीच नाहीये." काहीही करून मला फक्त घरी जायचे होते. व एवढेच माहिती होते की, जेव्हा तुम्ही कधी वादळात अडकतात तेव्हा तात्पुरत्या संरक्षणासाठी रेनकोट किंवा छत्री चा विचार न करता स्वतःवर विश्वास ठेवून संकटमय वादळाला सामोरे गेले पाहिजे. मंदिरात देवाच्या पाया पडून भर पावसात भिजत आम्ही गाडी घेऊन निघालो. सोसाट्याच्या वाऱ्यासह गाडीचा तोल सांभाळत, पावसाच्या सरींचा मारा चेहऱ्यावर, अंगावर झेलत आम्ही घरी निघालो. वीस मिनिटाच्या प्रवासात मी गाडी चालवत होते की विमान याचे भान देखील नव्हते. समोर शुभ्र पडदा दिसत होता व मी अंदाजाने गाडी चालवत होते. त्या पावसाच्या जोरदार तडाख्यात गोवा सीमा पार करून आम्ही आरोंदा बाजारात पोहचलो. तेथे मात्र पावसाची सर देखील नव्हती. आम्ही दोघी इतक्या कशा भिजलो म्हणून बाजारातील लोक आमच्याकडे बघू लागली व ओळखीची लोक "खय गों भिजाक गेल्यात?" अशी विचारू लागली.
त्या दिवशी एक गोष्ट कळाली, एवढ्या वादळी पावसातून, खड्डे असलेल्या मातीतील रस्त्यावरून आम्ही सुखरूप घरी पोहचलो ते केवळ माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे नव्हे, तर आपल्या घरातील मोठी माणसे आपल्यासाठी प्रार्थना करत असतात, सदिच्छा, आशीर्वाद देत असतात ते कधी कधी अतिशयोक्ती व भोळसट वाटतात. पण त्या दिवशी आम्हाला वाचवले होते ते या आशीर्वादानेच. आजूबाजूला कोणीही नसताना त्या वादळी तडाख्यातून खरंच निसर्गातील एका अदृश्य शक्तीने आम्हाला सुखरूप घरी पोहचवले होते व एक अविस्मरणय धडा देखील दिला होता.
होय, देवाकच काळजी!
लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर, कोथरूड, पुणे-३८
दिनांक - ७ जुन २०१६
पावसाची रिमझिम नुकतीच सुरू झाली. ऑर्डर दिल्या प्रमाणे आरोंदा बाजारातील जगप्रसिद्ध शेखर चा, हॉटेल मधील गरमा गरमा कांदा भजी व कडक चाय टेबल वर आली. ओलेचिंब असल्यामुळे तो गरम भजीचा वास व चायची वाफ यामुळे थोडी ऊब जाणवत होती. भजीचा आस्वाद घेताना मी दुसऱ्याच विचारात होते. आता दोन घटकांपूर्वी घडलेला तो प्रसंग, स्वप्नं होते की सत्य? अचानक चायच्या पेल्याचा जिभेला चटका बसल्यावर मी खरे भानावर आले.
पूर्वार्ध,
जून महिना म्हणजेच पावसाचे दिवस सुरू होते. मी गावा कडून पुण्याला येणार होते, म्हणून बाजारातून काहीतरी घेऊन यावे यानिमित्ताने मी व माझी भाची ऋतू आरोंदा बाजारात घरातील ज्युपिटर गाडी घेऊन निघालो. "पावसाचे दिवस आहेत सांभाळून गाडी चालवा गं, सुखरूप घरी या. देवाक काळजी!" अशा नेहमीच्या पाठ झालेल्या सूचना घरातील मोठ्यांकडून मिळाल्या. खरे तर! बाजारात जाणे हे फक्त निमित्त होते. आम्ही, केरी च्या समुद्र किनाऱ्यावर जाणार होतो. परंतु घरी जर खरे कळाले असते तर घरातून बाहेर जाण्याची परवानगी कधीच मिळाली नसती. आपल्या मुलांच्या अती काळजीपोटी कधी कधी पालकांकडून मुलांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण हरवतात व त्यामुळे मुले नकळत भ्याड बनून आत्मविश्वास हरवून बसतात. फक्त आरोंदा बाजारात जाण्याच्या अटीवर आम्ही गाडी घेऊन घरातून बाहेर पडलो. समुद्र भेटीच्या आतुरतेने व आज काहीतरी पहिल्यांदाच करत असलेल्या धाडसामुळे मन एकदम आनंदित होऊन गेले. तसे बघितले तर आरोंदा हे निसर्ग संपन्न सुंदर गाव गोवा राज्याच्या सिमेवर येते. बाजारातून दहा मिनिटाच्या अंतरावर गोवा हे राज्य. एका सीमाने जरी विभागले गेले असतील तरी हे दोन्ही प्रदेश आमच्या साठी एकच. त्या दिवशी महाराष्ट्रात म्हणजेच आरोंदा मध्ये पावसाचे तसे काहीच चिन्ह नव्हते. आकाश मोकळे होते. वाऱ्याच्या वेगाने सुसाट गाडी चालवत गाणी गात गोवा सीमा पार करून केरी च्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही पोहचलो. समुद्राच्या लाटांचा बेधुंद आवाज दूरूनच कानावर पडत होता. नेहमीप्रमाणेच किनाऱ्यावर वर्दळ नव्हतीच. गाडी स्टँड वर् लावताना एक परदेशी कुटुंब समुद्राचा मनसोक्त आनंद लुटून परतत होते. किनाऱ्यावर फक्त ते कुटुंब व आम्ही दोघी एवढेच होतो. आमच्या घरगुती कपड्यांवरून आम्ही कदाचित त्यांना गाववाले वाटले असू म्हणून त्यांनी आमच्या कडे बघून स्मित हास्य केले. जणू ते त्यांच्या हास्यातून सांगत होते की तुम्ही किती नशिबवान आहात, की तुम्हाला हा सुंदर , निर्जन समुद्रकिनारा लाभलेला आहे. गाडी पार्क करून आम्ही किनाऱ्यावरील आईचे आजोळ चे असलेले कुलदैवत श्री आजोबा च्या मंदिरात गेलो. पाया पडून थेट समुद्र किनारा पळतच गाठला.
किनाऱ्यावरील स्वच्छ चंदेरी मऊशार रेतीवर आमचे पाय उमटु लागले. अफाट लांब किनाऱ्यावर आम्ही दोघी सोडून एकही मनुष्य तिथे दिसत नव्हता. किनाऱ्याला आतुरतेने भेटण्यासाठी येणाऱ्या पारदर्शक बेधुंद लाटांचा खेळ आम्ही प्रत्यक्ष अनुभवत होतो. समोर दिसणारा तो अफाट समुद्र व आकाश जणू एकच आहे असे भासत होते. दूरवर तेरेखोल किल्ला डौलाने उभा होता. त्यावर आलेल्या काळ्या ढ्गांची छत्री मात्र सुरेख दिसत होती. आम्ही एका वेगळ्याच जगात होतो. काहीही न बोलता फक्त डोळ्यांनी त्या प्रत्यक्ष निसर्ग चित्राचा आस्वाद घेत होतो. समुद्राच्या पाण्यासोबत खेळताना वेळ कसा निघून जात होता याचे भानच राहिले नव्हते. खेळताना अचानक लक्ष तेरेखोल किल्ल्याकडे गेले आणि आश्चर्य! किल्ला आता तिथे दिसत नव्हता. मी घाबरून ऋतुला विचारले "ऋतू, अगं किल्ला कुठे गेला?" खेळत - खेळत आम्ही किनाऱ्यावरून दुसरीकडे आलो का? अशी मनात भीती वाटली, म्हणून मी पटकन मागे बघितले तर आजोबांचे मंदिर तर् तिथेच होते. परंतु किल्ल्या कडील दिशे कडे काळोख दिसत होता व आम्ही उभे होतो तिथे मात्र शुभ्र प्रकाश. पुढील क्षणातच तो काळोख पुढे सरकू लागला. व समुद्रावर जोरात पावसाचे मोती आदळू लागले. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही दोघी हातात हात घेऊन समुद्रातून मंदिराकडे धावत निघालो. हळूच मागे वळून बघितल्यावर फक्त काळे ढ्ग व पांढरा शुभ्र लाटांच्या भिंती जणू आमचाच पाठलाग करत आहेत असे वाटले. जीव मुठीत घेऊन आम्ही मंदिरात पोहचलो. व पायरीवर बसलो.पायऱ्यांवरून बघताना मगाशी दिसणारा शांत समुद्र आता दिसत नव्हता. आवेशाने पावसाच्या सरी कोसळत होत्या, बेधुंद वाटणाऱ्या लाटांचा आवाज आता भीतीदायक वाटत होता. सोसाट्याच्या वाऱ्याने समुद्रकिनऱ्यावरील झाडे एकमेकांना आदळत होती.निसर्गातील संगीताचा अभुतपुर्व सोहळा ऐकायला भेटत होता. पाऊस व वारा या दोघांमध्ये जणू स्पर्धा सुरू होती. व दोघेही माघार घेत नव्हते. समुद्राच्या रुद्र रूपाचे प्रथमच दर्शन घडत होते. व आता संपले सगळे, आयुष्यातील हा शेवटचा दिवस असे एक क्षणभर उगाच वाटून गेले. वेळ निघून जात होती तरी ते वादळ काही थांबत नव्हते.
घरी तर कोणालाही माहिती नव्हते आम्ही कुठे आहोत आणि आज इथे काही झाले तर घरी काय होईल? या विचाराने पोटात गोळा आला. समुद्र जरी खूप प्रिय असला तरी आज स्वतःला त्याच्यात सामावून घ्यायचे नव्हते. लगेच मी ऋतुला बोलले "चल घरी जावू". तिने आश्चर्याने माझ्या कडे बघितले , व बोलली "आत्या, या पावसात? आपल्याकडे रेनकोट, छत्री काहीच नाहीये." काहीही करून मला फक्त घरी जायचे होते. व एवढेच माहिती होते की, जेव्हा तुम्ही कधी वादळात अडकतात तेव्हा तात्पुरत्या संरक्षणासाठी रेनकोट किंवा छत्री चा विचार न करता स्वतःवर विश्वास ठेवून संकटमय वादळाला सामोरे गेले पाहिजे. मंदिरात देवाच्या पाया पडून भर पावसात भिजत आम्ही गाडी घेऊन निघालो. सोसाट्याच्या वाऱ्यासह गाडीचा तोल सांभाळत, पावसाच्या सरींचा मारा चेहऱ्यावर, अंगावर झेलत आम्ही घरी निघालो. वीस मिनिटाच्या प्रवासात मी गाडी चालवत होते की विमान याचे भान देखील नव्हते. समोर शुभ्र पडदा दिसत होता व मी अंदाजाने गाडी चालवत होते. त्या पावसाच्या जोरदार तडाख्यात गोवा सीमा पार करून आम्ही आरोंदा बाजारात पोहचलो. तेथे मात्र पावसाची सर देखील नव्हती. आम्ही दोघी इतक्या कशा भिजलो म्हणून बाजारातील लोक आमच्याकडे बघू लागली व ओळखीची लोक "खय गों भिजाक गेल्यात?" अशी विचारू लागली.
त्या दिवशी एक गोष्ट कळाली, एवढ्या वादळी पावसातून, खड्डे असलेल्या मातीतील रस्त्यावरून आम्ही सुखरूप घरी पोहचलो ते केवळ माझ्या गाडी चालवण्याच्या कौशल्यामुळे नव्हे, तर आपल्या घरातील मोठी माणसे आपल्यासाठी प्रार्थना करत असतात, सदिच्छा, आशीर्वाद देत असतात ते कधी कधी अतिशयोक्ती व भोळसट वाटतात. पण त्या दिवशी आम्हाला वाचवले होते ते या आशीर्वादानेच. आजूबाजूला कोणीही नसताना त्या वादळी तडाख्यातून खरंच निसर्गातील एका अदृश्य शक्तीने आम्हाला सुखरूप घरी पोहचवले होते व एक अविस्मरणय धडा देखील दिला होता.
होय, देवाकच काळजी!
लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर, कोथरूड, पुणे-३८
Comments