वणवा....
वणवा....
त्याने बोलायला पाहिजे होते. त्याला चांगले मित्र का नाही? त्याने तो विचार का केला? त्याला काय कमी होते? असे अनेक प्रश्न आपल्याला कोणी तरी निघून गेल्यावर पडतात.
त्याने बोलायला पाहिजे होते. त्याला चांगले मित्र का नाही? त्याने तो विचार का केला? त्याला काय कमी होते? असे अनेक प्रश्न आपल्याला कोणी तरी निघून गेल्यावर पडतात.
आपल्या आजूबाजूला ओळखीचे अनेक चेहरे असतात. मित्रमंडळी, नातेवाईक यांना आपण बघत असतो. त्यातील काही जण त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करतच असतात. त्यांची धडपड आपल्याला दिसत असते. पण त्याचे कर्म, त्याचे भोग, आपल्याला काय करायचं आहे?, बघेल की तो त्याचे , असे बोलून फक्त त्याची तळमळ काही लोक बघत असतात. तो उभारी घेण्यापेक्षा तो अजून कसा व किती खोलात जातो. हे लोक बघत असतात. व दुसऱ्यांना त्याची दुर्देवी कथा चघळून सांगत बसतात. शून्यातून उठून त्याने भरारी घेतली तर, त्याला कधी खुल्या मनाने दाद ही देणार नाही. कधी कधी लोक दाद पण प्रतिष्ठा, संपती पाहून देत असतात. एखाद्या गरिबाने केलेल्या प्रगतीला देखील काहीं कडून ईर्ष्या ने बघितले जाते. त्यामुळे कधी कधी तोच गोंधळून जातो. आपली प्रगती होत आहे की चूक.
कितीही हळहळ व्यक्त केली तरी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या असे म्हणून टळत नसतात. काही अनपेक्षित गोष्टी घडतच असतात. म्हणून तर कर्ण सर्व संपन्न शूर योद्धा होता तरी, भोवतालचा समाज त्याला तो क्षत्रीय नाही म्हणून स्वीकारत नव्हता. एकटे पाडत होता. याचे दुःख आयुष्य भर त्याला सलत होते. पण शेवटी मृत्यु ने त्याची ती सुटका केली. आपण तर सामान्य माणूस आहोत. माणसाला त्याच्या समस्या पेक्षा त्या घेऊन जगताना लोक आपल्याला समजून घेण्यापेक्षा वेगळे पाडत आहेत याचे दुःख जास्त असते.
एक नट गेल्यामुळे आपण पूर्ण बॉलिवूड ला सरास दूषणे लावत आहोत. ते वाईट असते असे सांगत आहोत. पण आपल्या नेहमीच्या आयुष्यात असे सुशांत, जिया आपण बघत असतो. कधी कधी ग्रुप मध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी आपण त्यांना एकटे पडत असतो. तो किंवा ती दुर्बल ,सायको , रागीट , चिडखोर, भांडखोर आहे म्हणून त्यांच्या पासून लांब जात असतो. आणि अचानक एक दिवशी ते जगातून निघून गेल्यावर त्यांनी कुठे तरी व्यक्त होयला पाहिजे होते. अशी हळहळ करतो. जर तुम्ही कोणाला मदत करू शकत नसाल तरी चालेल शेवटी प्रत्येकाची लढाई त्याला स्वतःला च लढाईची असते. पण ती लढत असताना आपुलकीचे दोन शब्द त्याच्याशी बोला कदाचित तो लढाई जिंकेल किंवा हरेल पण आपल्या सोबत कोणीतरी आहे हे समाधान त्याला नवीन उमेद देईल. एकमेकांच्या इर्षेने वणव्या सारखे जंगल खाक करणारे आयुष्य जगण्यापेक्षा पेक्षा दयाळू पणाचे पाण्याचे शितल थेंब होऊन शांत आयुष्य व्यतीत करू हीच अपेक्षा.
लेखक- कु. समिक्षा श्रीधर केरकर
Comments