निसर्गपुजा - समृद्ध वारसा

निसर्गपुजा - समृद्ध वारसा लॉकडाउन च्या निमित्ताने लहानपणी रविवारी बघितलेले रामायण पुन्हा बघता आले . आणि त्यातील सीता देवी चे भूमीत जाणे हा प्रसंग पहिल्यावार लहानपणीचा एक किस्सा आठवला . त्या रविवारी सकाळी रामायण मधील सीता भूमीत जाण्याचा प्रसंग बघून आम्ही लहान मुले रडायलाच लागलो . व खूप विचार करत बसलो . सीता जमिनीत गेली म्हणजे ती जमीन पवित्र झाली . ती अजुनही तिथेच आहे म्हणून घरातून बाहेर पडताना आम्ही लहान मुले आपला चप्पल घातलेला पाय जमिनीला स्पर्श च करू देत नव्हतो . कसरत करून मातीला पाय न लावता फक्त सिमेंट च्या पायरीचा वापर करत होतो . आपला पाय पवित्र जमिनीला लागू नये याची काळजी दिवसभर घेत होतो . आता त्या बालिश बुद्धीचे हसूच येते . पण आता आपल्या या हिंदू संस्कृती चे कौतुकच वाटते . निसर्गातील प्रत्येकाला आपण देवाचे रूपच मानत आलो आहोत . कोंकणातील प्रत्येक घरातील देव घरा जवळील भिंती वर नागोबा चे चित्र रंगवलेले किंवा ...