Posts

Showing posts from June, 2020

बाबा | बापाशी | पप्पा

Image
||  श्री || बाबा...     बाबा काय लिहू आज तुमच्या बद्दल? तुम्ही असताना नव्हता असा दिवस.आज सगळ्यात जास्त मला आठवत आहे ती दिवसातून शंभर वेळा  बाबा, पपा, बापाशी इत्यादी अशा सारख्या हाका मारून तुम्हाला बोलवत राहणे.  तुम्ही अजून कसे घरी आलात नाहीत म्हणून तुम्हाला सतत फोन करत राहणे., तुम्ही कामावरून घरी आल्यावर आणलेल्या खाऊ साठी तुमची बॅग उचकटून पाहणे. गाडी वरून फिरायला घेऊन जाण्यासाठी सारखा हट्ट करणे.  बाबा मला अजूनही आठवत आहे लहानपणी तुम्ही दाखवलेले जाणता राजा नाटक, घरी आणलेली गोष्टीची पुस्तके, बालवाडी पासून ते इंजिनिरिंग पर्यंत प्रोजेक्टला केलेली मदत, तुमची प्रत्येक आठवण सांगत दाखवलेला आपला गाव. अशा असंख्य आठवणी असतील.  तुम्ही न बोलता सगळे काही कळत होते. तुमचा स्वतःशीच संघर्ष दिसत होता. पण त्या वेळीस काहीच करता येत नव्हते. तेव्हाच ठरवलेले सगळी स्वप्न पूर्ण करायची ती तुमचीच. तुम्हाला आयुष्यात जे काही नाही मिळाले ते सगळे मिळवून द्यायचे. तुम्ही गेलात आणि ती स्वप्न देखील तुमच्या बरोबर गेलीत.     तुमचा संघर्ष तुम्ही कधीच नाही सांगितला. इतर...

वणवा....

Image
वणवा.... त्याने बोलायला पाहिजे होते. त्याला चांगले मित्र का नाही? त्याने तो विचार का केला? त्याला काय कमी होते? असे अनेक प्रश्न आपल्याला कोणी तरी निघून गेल्यावर पडतात. आपल्या आजूबाजूला ओळखीचे अनेक चेहरे असतात.  मित्रमंडळी, नातेवाईक यांना आपण बघत असतो. त्यातील काही जण त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करतच असतात. त्यांची धडपड आपल्याला दिसत असते. पण त्याचे कर्म, त्याचे भोग, आपल्याला काय करायचं आहे?, बघेल की तो त्याचे , असे बोलून फक्त त्याची तळमळ काही लोक बघत असतात. तो उभारी घेण्यापेक्षा तो अजून कसा व किती खोलात जातो. हे लोक बघत असतात. व दुसऱ्यांना त्याची दुर्देवी कथा चघळून सांगत बसतात. शून्यातून उठून त्याने भरारी घेतली तर,  त्याला कधी खुल्या मनाने दाद ही देणार नाही. कधी कधी लोक दाद पण प्रतिष्ठा, संपती पाहून देत असतात. एखाद्या गरिबाने केलेल्या प्रगतीला देखील काहीं कडून ईर्ष्या ने बघितले जाते. त्यामुळे कधी कधी तोच गोंधळून जातो. आपली प्रगती  होत आहे की चूक. कितीही हळहळ व्यक्त केली तरी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या असे म्हणून टळत नसतात. काही अनपेक्षित गोष्टी घडतच अस...

शेवट गोड करी....

Image
शेवट गोड करी.... शेवट गोड करी! गुरुराया, शेवट गोड करी! शेवट गोड करी! गुरुराया, शेवट गोड करी! या भजनाच्या ओळी लहानपणी रविवारी कलावती आईं च्या  मंदिरात  जेव्हा ऐकू यायचा तेव्हा काही पेंगलेली लोक व आम्ही लहान मुले लगेच भानावर येऊन उत्साहात टाळ्या वाजवून मोठ्याने हे भजन म्हणत असू. कारण हे भजन सुरू झाल्यावर कळायचे हे शेवटचे भजन संपून आता भजनाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आणि स्वादिष्ट गोड प्रसाद खायला भेटणार. त्यामुळेच सगळ्यात आवडीचे भजन होते शेवट गोड करी!. पण खरच शेवट गोड असतो का?? इतिहासात बघितले तर एखादी व्यक्ती, प्रसंग, आठवण जितकी संघर्षमय त्याचा शेवट तितकाच उत्कृष्ट व काहीतरी नवीन गोष्ट शिकवून देणारा. म्हणूनच, महाभारत झाल्यावर काही चांगल्या तर काही वाईट गोष्टींचा संहार झाला. अनेक समर्थ वीर योद्धे सामर्थ्यवाण असून देखील काळच्या पडद्याआड गेले. परंतु त्यांच्या शेवटाने त्यांचे संघर्षमय जीवन संपवून मुक्तीच दिली. त्याच प्रमाणे जीवन जगण्याची पवित्र गीता अखंड मानव जातीला कळाली.  आपल्या जीवनातील काही आठवणी, प्रसंग आपल्याला त्या क्षणी क्लेशकारक, दुःखदायक वाटत असतात...

जून.....

Image
आनंद, भीती, हुरहूर, उत्सुकता यांसारख्या संमिश्र भावना अनुभवायला लावणारा महिना म्हणजेच जून महिना. वर्षाचा मध्यबिंदू म्हणजेच जून महिना. उन्हाळ्याची झळ सोसल्यावर आनंदाच्या पर्जन्याची वेडी वाट बघायला लावणारा जून हा महिना. खरपूस भाजून निघालेल्या मातीचा पहिला सुगंध याच महिन्यात अनुभवायला मिळतो. शाळेच्या ओढीमुळे उन्हाळी सुट्टी संपवून गावातील आठवणी मनात साठवून; आंबा, फणस, काजू, नारळ, तांदूळ इत्यादी गावाकडील शिदोरी थोड्या दिवसांसाठी आपल्याजवळ घेऊनच आपण या महिन्यात परतत असतो. शाळा, कॉलेज कितीही नको वाटले तरी पुढचा वर्ग, नवीन पुस्तक, वह्या, दप्तर, कंपास पेटी, छत्री, रेनकोट यांचा आनंद याच महिन्यात भेटतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात पूर्ण न करू शकणारे संकल्प पुढील सहा महिन्यात पूर्ण करण्याची नवीन संधी देणारा हाच महिना. नेहमी सारखेच आनंद देणारा जून महिना या वर्षी मात्र वेगळाच असेल. कदाचित नेहमी प्रमाणे पाऊस असेलही परंतु नेहमी प्रमाणे प्रत्यक्ष मनसोक्त चिंब त्यात भिजता येणार नाही. शाळा, कॉलेज परत सुरू होण्याचा उत्साह ओसरला असेल. यंदा जुने संकल्प सोडून नवीन जगण्याची कला आपल्याला आत्मसात करावी ...